Monday, February 14, 2011

"आठवण"

कसं कुणास ठाऊक?

मन आणि डोळे,

यांचं संगनमत झालंय.....

तुझ्या आठवणींत आता,

रात्र रात्र जागायचं ठरलंय.....

तुझी आठवण येताच डोळे भरुन येणं,

हे आता नित्याचंच झालय......

पण डोळे जरी भरलेले असले तरी,

मन मात्र रितं रितं होऊन गेलंय..........

खुपदा विचारतो मी माझ्या मनाला,

हे असं कसं होऊन बसलंय,

डोळे पहाताहेत वाट तुझ्या येण्याची,

अन मन मात्र केव्हाच "भुतकाळात" रमुन गेलंय.....

No comments:

Post a Comment