Monday, February 14, 2011

"अवखळ कविता"

सहजच......
मी म्हणालो तीला,
मलाच नेहमी,
नमतं घ्यावं लागतं,
ती म्हणाली मला,
माझं फक्त "सॉरी"
म्हटलं की भागतं......

मी म्हणालो तीला,
हा तुला भलताच,
"अ‍ॅटिट्युड" आहे,
ती हसुन,चिडवत म्हणाली,
आज माझा....
भांडणाचा "मूड" आहे......

मी म्हणालो आपण दोघं,
असेच भांडणार आहोत का..?
एकांतवासात असेच अश्रु,
सांडणार आहोत का...?

ती म्हणाली नाही...
तु सॉरी म्हटलंस,
की माझं मन पाघळतं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब होऊन विरघळतं.....

मग मी ही तीला हळुच,
कवेत घेऊन म्हणालो "सॉरी"
तशी ती ही मुरकत म्हणाली,
फिर पहले क्युँ, "जान" ली हमारी.......

       










नंदू

No comments:

Post a Comment