Monday, February 14, 2011

"प्रेम"...

एक मधाळ भुंगा,
फुला भोवती,
रुंजी घालु लागला...
अन आपल्याही नकळत,
फुलावरच भुलु लागला...

त्या फुलालाही तेच हवं होतं,
तेही थोडसं लाजलं...
अन भुंग्याच्याही मनात,
फुलाविषयी प्रेम रुजलं....

जमलं हो जमलं,
त्या दोघांचं प्रेम जमलं...
दोघांचं मन एकमेकांत,
पुर्णपणे रमलं....

आणि एक दिवस,
गहजब झाला,
बागेच्या माळ्याने ते फुल खुडलं...
भुंगा झाला कासावीस,
त्याचं जीवना वरचं लक्षच उडलं....

भुंग्याचं मन,
विचार करु लागलं...
त्या फुलासाठी,
झुरु लागलं...

अन एक दिवस,
ते कुस्करलेलं फुल,
भुंग्यासमोर आलं.....
भुंग्याचं मन देखील,
विस्कळीत झालं...

ती दोघंही हातात घालुन हात,
चालु लागले आपली वाट...
पण दोघांच्याही मनात,
घातला जात होता,
आत्महत्येचा घाट....

प्रेम कहाणीत नेहमी,
असंच का होतं...
प्रेम नेहमी,
अयशस्वी का होतं....

पुराण काळा पासुन,
चालत आलेलं,
लैला मजनु,
शिरीन फरहादचं जे झालं,
तेच त्या फुलाच,आणि भुंग्याचं झालं......

आजच्या या निर्दयी जगात भेटतील,
अशी कैक कुस्करलेली फुलं,
अन विस्कटलेले भुंगे....
जी कधीच रमली नाहीत,
एकमेका संगे........

            








   नंदू

No comments:

Post a Comment