Wednesday, April 27, 2011

बाप्पा.... "तुम्ही"

आज सकाळी सकाळी,
दारावर टकटक झाली,
अन माझी झोपच ऊडाली,
आळसावलेल्या डोळ्यांनीच,
दार उघडले,
आयला,पहातो तर काय,
दारात चक्क बाप्पा अवतरले....

अंगभर दुधाचा अभिषेक जसाच्य तसा,
धुप,उदबत्तीच्या धुराने खवखवतोय घसा,
पलंगावर माझ्या विराजमान झाले,
मी जरासा चिडलोच, तसे म्हणाले,
जरासा फ्रेश होऊन येतो,
आणि आल्यावर ब्लॅक कॉफी घेतो.....

मी त्यांना विचारलं आलात कसे,
म्हणाले उंदराला पार्क केलंय,
पार्कींग प्लेसमध्ये कसेबसे,
म्हणाले काल मंगळवार होता,
अंग बघ कसं सर्व आंबलंय,
त्यात पुरोहितांनी दुध अन,
फुलांनी तिंब तिंब तिंबलंय.......

मी जरासा साशंकच.....
तर म्हणाले लेट मी ईंट्रोड्युस,
माय नेम इज "गणेश शंकर देव"
मी उडालोच,म्हटलं,
देवा तुम्ही चक्क ईंग्लीश बोलता,
हसुन म्हणाले, अरे वेड्या,
मी विद्येचा वाचस्पती,चौसष्ट कलांचा देव,
अनेक भाषांमध्ये मुशाफिरी करतो,
अगदी चालता बोलता.....

माझ्या मनात विचारांचे काहुर,
ते जाणुन म्हणाले,
अरे तुम्ही येताना रोज,
माझ्याकडे घेऊन तुमच्या रडकथा,
देवाची ऐकणार आहे कोण व्यथा,
म्हणुनच आलोय तुझ्याकडे,
आपल्या मनीचं गुज सांगण्या,
भंडावुन सोडतात नुसते रडुन रडुन,
देतात माझ्याच मनावर डागण्या......

मी म्हटलं देवा,
आता दोन-चार दिवसांची लीव्ह टाक,
आणि फिरुन ये आल्प्स पर्वतांची रांग,
तसा म्हणाला,
चार वेळा फाडुन टाकलंय तिकिट स्वीस एअरचं,
ईमर्जंन्सीमुळे जाता आलं नाही,आता सांग....

बराच गप्पा टप्पा झाल्यानंतर,
म्हणाला आता मी जातो,
नैवेद्याची झालीय वेळ,
तुझ्याशी गप्पा खुप रंगल्या,
म्हणून कळलंच नाही कसा गेला वेळ....

तो गेल्यावर पुन्हा दारावर "टक टक"
मनात म्हटलं हा काही विसरला तर नाही,
तर दारात पुन्हा हा दत्त म्हणून उभा,
म्हणाला मी नाही काही विसरलो,
पण जाताना मात्र,
हीच निस्सीम श्रद्धा ठेऊन जातोय,
ती गोड मानुन घे रे बाबा......

मनात म्हटलं आता होताच हा बरोबर,
तर कोर्‍या कॉफिसाठी,
थोडं दुध मागितलं असतं,
अन चक्क आकाशवाणी झाली,
टिपिकल मराठी माणुस आहेस,
वेड्या, मागुन मागुन मागितलंस काय,
तर दुध.....
कालच्या अजिर्णामुळे माझ्या वाटेला,
आलंय बघ जरासं वरण,भाताची एक मुद....

मीही जरासा अंतर्मुख झालो,
पण देवाच्या व्यथेने,
उगाचंच आलं अंमळ हसायला,
अन अचानक थंड पाणी पडलं डोक्यावर,
बायको विचारत होती,
काय झालं असं झोपेत खुदुखुदु हसायला.........????









नंदू

आज पुन्हा एकदा.....

आज पुन्हा एकदा पंख लावुन,
आभाळात उंच उडावसं वाटतंय,
आज आतुन मन हसत असलं तरी,
उगीचंच कुणावर तरी चिडावसं वाटतंय.....

का होतं असं कुणी सांगेल का...?
आभाळातील ईंद्रधनु रंगेल का...?
हे कुणाला तरी विचारावसं वाटतंय,
कुणाच्या तरी गळ्यात पडून,
मनसोक्त रडावसं वाटतंय.........

आज खुप दिवसांनी बहरलेय मी,
का कुणास ठाऊक पण,
त्याच्या आठवणींनी शहारलेय मी,
हे कुणाला तरी सांगावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा राहुन राहुन,
माझं मलाच चिडवावसं वाटतंय......

बावरलेल्या मनाने चहुकडे पाहतेय मी,
आज न राहुन स्वतःच लाजतेय मी,
हितगुज माझ्या मनाशीच करावसं वाटतंय,
आज आभाळाकडे तोंड करुन,
आनंदाने ओरडावसं वाटतंय..........

नंदू

ऐन वसंतातल्या त्या रात्री....

ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री,
पावसाची एक जोरदार सर आली,
ऋतुराजाच्या त्या अवचित आगमनाने,
रातराणी ही बेभान झाली.....

अवखळ वारा ही होता संगतीला,
प्राजक्ताचा गंध ही होता पंगतीला,
आसमंत ही कसा बहरून आला,
सुटला दरवळ ओल्या मातीला.....

आकाशीचा चंद्रमा ही,
हसत होता गाली,
चांदणीच्या ही मुखकमलावर,
फुटली होती लाली,
निसर्गाचा हा अनोखा खेळ पहात,
झाडावरची पाखरं ही चिडीचुप झाली.....

तशातच ती,
त्याच्या हाताला धरुन,
आडोसा शोधीत होती,
पावसाच्या अवचित कोसळण्याने,
दोघंही चिंब भिजत होती,
त्याची चोरटी नजर,
तिच्या चेहर्‍यावर खिळली,
तिच्या केसांतली एक ओली बट,
तिच्या नाजुक गालाशी झोंबत होती.....

मग तोही जरासा बावरला,
तिने ही ढळणारा पदर सावरला,
ती दोघंही मग,
प्रितीची वाट चालू लागली,
कोकिळही बेभानपणे,
मस्त शीळ घालू लागली.....

ऐन वसंतातली ती रात्र,
कशी बेधुंद झाली होती,
त्या प्रेमिकांच्या मनातली,
दरी ही अरुंद झाली होती,
अवखळ वारा आता कसा,
बेधुंद,बेलगाम झाला होता,
अन ओली माती सुगंधाने,
कशी स्वच्छंद न्हाली होती.......









नंदू

मी कोणी तुझा लागतो

मी विसरुनच जातो कधी,
मी कोणी तुझा लागतो,
मग का असा आठवणींत,
तुझ्या रात्र रात्र जागतो.....

मलाच नसते कळत काही,
ही आसवे का अशी ओघळतात,
तुझी आठवण असते की भास,
हे सांगण्या मला ह्रदया पर्यंत पळतात.....

मनाला शांतवण्या साठी मग,
हलकेच मी उशीत विरघळतो,
आकाशीचा चंद्र मात्र तेव्हाच,
चांदणीच्या कुशीत पाघळतो.....

मग कधी तरी तुझी चाहुल लागते,
माझ्या मनाचा कोपरा ही सुखावतो,
लगबगीने तुझ्यासाठी दार उघडताच,
सुर्य किरणांचा तांडा आत डोकावतो.....

तारवटलेल्या डोळ्यांनी समोर बघताच,
भिंतीवरल्या तसबिरीतला तुझा,
हसरा चेहरा मला रोज बघतो,
अरेच्च्या.........
मी विसरुनच जातो कधी,
मी कोणीतरी तुझा लागतो.....
मी कोणीतरी तुझा लागतो.....












नंदू

!!! इथे काही घडतच नाही !!!

इथे काही घडतच नाही....
ओल्या गवतावर दंव पडतच नाही,
पहाटेचा सुर्य ही इथे उदासच भासे,
इथला पक्षीही काही केल्या उडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
इथल्या गायी वासरांना चारा उरतच नाही,
उपासलेल्या पोटांनी फिरती बिचारी,
कारण इथल्या नेत्यांची पोटं भरतच नाही....

इथे काही घडतच नाही....
मंदिरात रांग लागतच नाही,
व्हिआयपी पासाला मागणी इथे फार,
कारण पुजार्‍याचे दक्षिणेशिवाय भागतच नाही....

इथे काही घडतच नाही....
निसर्गाची हानी वाचतच नाही,
सिमेंटच्या जंगलात मनुष्याचेच प्राण वेठीस,
कारण इथल्या राज्यकर्त्यांना,
चांगले काही सुचतच नाही....

इथे काही घडतच नाही....
कुणी कुणाच्या भानगडीत पडतच नाही,
मला काय करायचे त्याचे म्हणून,
मेलेली मनं कधी रडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
लहानग्याच्या तोंडात दुधाचा थेंब पडतच नाही,
पावडरच्या दुधावरच भागव म्हणते माय त्याची,
माऊलीला पान्हा कधी फुटतच नाही....

इथे काही घडतच नाही....
खाचखळग्याची वाट संपतच नाही,
अंतिम ध्येयासाठी ही अडथळे फार,
लाचेचं दान टाकल्याशिवाय,
इथल्या फाईलीचं पाऊल पुढे पडतच नाही....

इथे काही घडतच नाही....
सुदैवाचे दान काही पडतच नाही,
सांगण्या सारखे इथे फार काही आहे,
पण शुष्क झालेल्या ओठांवर,
ओला शब्द काही केल्या येतच नाही....









नंदू

एक शहर....

एक शहर ऐसा भी....
जहाँ घडी की सुई से तेज,
ईन्सान की टांगे चलती है....

एक शहर ऐसा भी....
जहाँ लकडी और कोयले की जगह,
दहेज के कारण दुल्हने जलती है....

एक शहर ऐसा भी....
जहाँ चंद रुपयों के लिये,
मासुम कलीयों की सेज सजती है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ सुहाग रात पहले बाद में,
विवाह की शहनाई बजती है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ रास्ते कम होते है,
गाडीयां ज्यादा दिखाई देती है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ के स्कुलों में"अ‍ॅटीट्युड"ज्यादा,
पढाई कम सिखाई जाती है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ का समंदर बडा गहरा है,
जहाँ के लोगों के दिल बडे साफ है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ की मिठ्ठी की भिनीसी खुशबु,
आते ही,दिल कर देता सबको माफ है.....

एक शहर ऐसा भी....
जहाँ की रंगीन होती सुबह और शाम है,
ऐसा वह प्यारा शहर"मुंबई"उसका नाम है.....

एक शहर ऐसा ही......
जिस को कोटी कोटी मेरा प्रणाम है,
जिस के रखवालों को तहे दिल से मेरा"सलाम"है.....








नंदू

आशेचा किरण

अंधारवाटेवरुन एकटाच होता चालत,
तो प्रकाश किरणाच्या शोधात.....

रक्ताळलेल्या पायांनी ठेचकाळत,
वेदनेला उराशी घट्ट कवटाळत,
मिट्ट काळोखात हातांनी चाचपडत,
एक तरी आशेचा किरण दिसेल,
या भावनेने आपल्याच नादात....

मैलोगणीक चालल्यानंतर मात्र,
एक आशेचा किरण दिसला,
त्याला पाहुन तोही ओशाळवाणं हसला,
म्हणाला मीही शोधत फिरतोय,
या निराशावादी जगात एकातरी,
आशावादी माणसाला.....

मग म्हणाला अरे वेड्यांनो,
निराश होण्याचे काहीच कारण नाही,
निराशावादी जगात एक तरी,
आशेचा किरण असतो,
जो नंतर मोठा प्रकाशमान होतो,
पण निराशावादी माणुस मात्र,
त्याच त्याच निराशेच्या गर्तेत,
सतत गटांगळ्या खातो.....

अन आशावादी माणुस मात्र,
पुन्हा उठुन चालु लागतो,
काळोख्या वाटेवरुन प्रकाशाच्या शोधात,
नव्या उमेदीने अन नव्या उभारीने,
आपल्याच नादात.....











नंदू

एक श्वास

एक श्वास तुझ्या प्रितीचा,
मला हवा हवासा वाटतो,
तुझ्या स्पर्शा स्पर्शा मधुनी,
रोमांच ह्रदयी का दाटतो......

माझ्या श्वासात तुझा,
श्वास जेव्हा मिसळतो,
माझ जीव तेव्हा,
तीळ तीळ का तुटतो......

मुक्तपणे चांदण्यात फिरताना,
मी मात्र चांदणी होऊन जाते,
हळुच डोळ्यांच्या कडातुन पाहताना,
तुझा चेहरा चंद्रासम का भासतो.....

प्रितीचे स्वप्न हे माझे,
तुला ही ते पडते का रे,
वेड्या स्वप्नीच रमते मी रे,
डोळा मात्र टक्क जागा असतो.....

आता हे सर्व आठवताना,
माझी मी न राहते रे,
उरीच्या जीर्ण जखमांचा,
एकेक टाका का तुटतो.....

सरकणार्‍या आठवणींना मी,
मात्र आता कुलुपबंद केलंय,
तरी ही डोळ्यांत आठवणींचा,
अश्रु नेहमीच का साठतो......

प्रितीला विरहाचा शाप,
हा नित्याचाच आहे का रे,
म्हणुनच का प्रितीतला,
शेवटचा श्वास ही गोड वाटतो.....

नंदू