Monday, February 14, 2011

पत्रं...

सहजच......
का कुणास ठाउक,
तुझी पत्रं डोळ्यासमोर येतात,
ह्रदयाला डागण्या देउन,
अवचितपणे छळत रहातात....

चटके देण्याचं काम,
पत्रांनी केलं तरी,
शब्द मात्र डोळ्यांवाटे,
अविरत गळत रहातात......

ओठ बांधलेले,
असतात हुंदक्यांनी,
अश्रु मात्र ह्रदयाकडे,
अलगद वळत रहातात......

आठवणीत येउन छळायचंच होतं,
तर हे पत्र तरी का......?
नकळत का होईना हे प्रश्न,
मनाला सतत जाळत रहातात.......

      








नंदू

No comments:

Post a Comment