Monday, February 14, 2011

"वेदना"

"वेदना".......
हिच तर "वेदना" आहे सार्‍या भारताची,
ती कुणाला कळत नाही........
जखम भळभळतेय उरीची,
पण रक्तच गळत नाही.........
उदासीन राज्यकर्ते,
लाचार आहे जनता.......
मग उगीचंच तुम्ही,
भारताला "महान" का म्हणता...??
राष्ट्रकुलामध्ये भारताची मानहानी झाली,
महागाई भिडली गगनाला,जनता मात्र बेहाल झाली.....
साठेबाजानी भरल्या तुंबड्या, जनतेची झोळी मात्र रीती,
मग्रुर राज्यकर्त्यांना मात्र कसलीच राहीली नाही भिती....
वालीच उरला नाही कशाला,
हतबल झाली जनता......
मग उगीचंच तुम्ही,
भारताला "महान" का म्हणता...??

               नंदू

No comments:

Post a Comment