Thursday, August 18, 2011

मैत्रीचं नातं...

वार्‍याच्या वेगाने मन जेव्हा,
इतस्ततः भिरभिरु लागतं,
सालं नेमकं तेव्हाच आठवणींचं,
वासरु बेभानपणे उंडारु लागतं....

विजेच्या वेगाने गतस्मृति,
जेव्हा मनावर कोसळु लागतात,
गहिवरुन पडणार्‍या जलप्रपाता सम,
अश्रु ही डोळ्यांवाटे ओघळु लागतात....

ह्रदयी पेटलेला वडवानल,
जेव्हा शमता शमत नाही,
सालं विस्कटलेलं मन तेव्हा,
कुठल्याच गोष्टीत रमत नाही....

हे असं का होतं म्हणून,
मैत्रीचं नातं जोर जोराने,
आक्रंदन करु लागतं,
सालं दुष्ट विचारांचं वादळ,
नेमकं तेव्हाच मनात,
घोंघावु लागतं....












नंदू

No comments:

Post a Comment