Saturday, August 13, 2011

"माणुसकी"....

पवनेच्या पाण्यावरुन,
राजकारण कमालीचे रंगले,
पोलीसांच्या खांद्यावर,
बंदुक ठेऊन गोळ्या मारण्यात,
राज्यकर्ते चांगलेच दंगले....

पवना काठचा धोंडी,
बघा आक्रमक झाला,
हक्काच्या पाण्यासाठी,
रस्त्यावर उतरला,
राज्य कर्त्यांचा सुद्धा,
संयम किंचित सुटला,
बेछुट सुटणार्‍या गोळ्यांवर,
निरपराध शेतकर्‍याचाच,
जीव कोरला गेला....

मग गल्ली पासुन,
दिल्ली पर्यंत राजकारण,
भलतेच रंगले,
पण त्या भुमिपुत्राच्या,
पिल्लांचे स्वप्नं मात्र,
काचे सारखे दुभंगले....

"आरक्षण"चा वाद पहा,
इथे भलताच तापतोय,
इथे प्रत्येक जण,
दुसर्‍या वर कुरघोडी,
करु पाहतोय....

पाला पाचोळ्या सम,
विखुरल्या गेल्यात इथे,
अनेक जाती पाती,
अरे माणसं आहोत आपण,
रानटी जनावरं नाही,
मग माणुसकी हरवलेल्या,
या जगात जपुया ना,
थोडीसी "माणुसकीची नाती".....







नंदू

No comments:

Post a Comment