Sunday, July 31, 2011

क्षण भंगुर जीवन....

क्षण भंगुर हे जीवन झाले,
किंमत त्याची कवडी मोलाचीच,
आश्वासनांची खैरात जाहली,
पण प्रत्यक्षात मात्र....
भात बोलाचा अन कढी ही बोलाचीच....

दहशत वादाला नसतो चेहरा,
नसते जात अन धर्म,
असते भाषा फक्त बॉम्ब,गोळ्यांची,
निरपराधांचा जात असे बळी,
अन राख होते जीवन मुल्यांची....

सत्तेच्या बाजारात माणुसकीला,
आली किंमत पहा शुन्याची,
पैशाची चढलीय धार पापाला,
भिती वाटु लागली पुण्याची....

मेल्या मढ्यावरचे लोणी खाती,
काय पडलीय त्यांना कुणाची,
विकृत विळखा घट्ट होऊ लागला,
घालमेल होतेय सच्च्या मनाची....

राज्य कर्ते उदासिन येथे,
बापुडवाणी स्थिती दीनांची,
वेठीस धरती दीन दुबळे,
सरशी होई येथे गनिमांची....










नंदू

No comments:

Post a Comment