Thursday, July 28, 2011

पाऊस म्हणजे....

पाऊस म्हणजे,
एक गोड आठवण....
पाऊस म्हणजे,
ओली चिंब साठवण.....
पाऊस म्हणजे,
धरीत्रीचा ओला मृदगंध....
पाऊस म्हणजे,
इतरांसोबत,
उपभोगलेला स्वानंद....
पाऊस म्हणजे,
सागराची शांत गाज....
पाऊस म्हणजे,
निसर्गाने ल्यालेला,
हिरव्या पाचुचा साज....
पाऊस म्हणजे,
सागर मिलनासाठी,
निघालेली अवखळ सरीता....
पाऊस म्हणजे,
निर्मळ मनाची आनंदीता....
पाऊस म्हणजे,
बिस्मिल्लांची सुरेल शहनाई....
पाऊस म्हणजे,
वेडावलेली अल्लड तरुणाई....
पाऊस म्हणजे,
रविशंकरजींची सतार,
पाऊस म्हणजे,
ह्रदयीची छेडलेली तार....
पाऊस म्हणजे,
हिरवाईला आलेला बहर....
पाऊस म्हणजे,
उधानलेल्या मनांचा कहर....
पाऊस म्हणजे,
भोळा शंकर,
हिमनगावर उभा....
पाऊस म्हणजे,
अंगावर कोसळणारा,
बेधुंद धबधबा....
पाऊस म्हणजे,
गारठलेली थंड पहाट....
पाऊस म्हणजे,
सागराची सळसळणारी लाट....
पाऊस म्हणजे,
गरम भज्यांचा खमंग स्वाद....
पाऊस म्हणजे,
वाफाळलेल्या चहाचा आस्वाद....
पाऊस म्हणजे,
तुषारलेली तृणपात....
पाऊस म्हणजे,
धरीत्रीने जोडलेली,
निळ्या घनाशी रेशीमगाठ....
पाऊस म्हणजे,
लिहिण्या सारखं,
अजुन बरंच काही....
पाऊस म्हणजे,
तुर्तास एवढंच,
आणिक काही नाही.....










नंदू

No comments:

Post a Comment