Wednesday, July 27, 2011

अशांत

भावना माझ्या जाणुन घे कधी,
हे माझ्या अंतरीचा भाव सांगतो,
दरवळ तुझ्या आठवणींचा,सतत,
माझ्या श्वासात दरवळत असतो....

अथांग सागर ही शांत भासतो,
मी ही एकांती सैरभैर असतो,
माझ्या प्रत्येक श्वासातला गंध,
क्षणोक्षणी तुलाच शोधत असतो....

गतस्मृतींना आठवत त्या,
शांत किनारी एकटाच बसतो,
पण तुझ्या गजर्‍याचा सुगंध,
माझ्या भोवती घुटमळत असतो....

आज तु नाहीस पण मी आहे,
तो सागर ही शांत शांत आहे,
त्या किनार्‍यावर राहीलेलं,
माझं मन मात्र कसं अशांत आहे....
कसं अशांत आहे........................
 नंदू

No comments:

Post a Comment