Friday, March 25, 2011

हे कळतंच नाही नंतर...

प्रेमाच्या एकाच वाटेवर,
चालत होतो आपण,
ठेऊनी जरासे अंतर,
विरघळल्या साई सारखे,
कधी,कसे एकरुप झालो,
हे कळलेच नाही नंतर....

तु ही तीच अन,
मी ही तोच होतो,
पण असे वाटले तेव्हा,
जगण्याचा मार्ग दिसला,
विरहात होरपळल्या नंतर.....

अंतरंगीचे रंग हे जणु,
भासत होते कोरडेच तेव्हा,
पण खरा रंग मनी भरला,
तु ह्रदयी विसावल्या नंतर....

अंधार अंतरी दाटला होता,
प्राणही शुष्क भासत होता,
अंधारलेल्या वाटेवर मला,
हा लोभसवाणा चेहरा दिसला,
अंतरीचा दिवा उजळल्या नंतर.....

ती वाट ही जराशी,
आता संकोचली होती,
तुला काही विचारण्या,
खुप आतुरली होती,
पण भानच ना उरले तेव्हा,
तुझे स्मित झळकल्या नंतर....

आता ती वाट,
फार मळली आहे,
जीवनाच्या रगाड्यात,
रुळली आहे,
आता मात्र ठेवावे,
लागतच नाही अंतर,
तरी सुद्धा कधी,
कसे एकरुप होतो,
हे कळतंच नाही नंतर.......
हे कळतंच नाही नंतर.......












नंदू

No comments:

Post a Comment